कोकणदेश-विदेशमहाराष्ट्ररेल्वे

ट्रॅकवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

करमाळी-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास चार तास रखडली; इतर काही गाड्यांना ही ‘लेटमार्क’

रत्नागिरी : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळासाठी बाधित झाली.

कोकण रेल्वेच्या कुडाळ तसेच सिंधुदुर्ग स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून याचवेळी या भागातून जाणाऱ्या काही गाड्या थांबवण्यात आल्या. यामध्ये करमाळी ते एलटीटी मार्गावर धावणाऱ्या एसी सुपरफास्ट गाडीचा समावेश होता. ही गाडी सुमारे चार तास उशिराने धावत होती. रेल्वे रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वेची कोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button